सत्ताधारी मोदी सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ (MGNREGA) मधील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे नाव वगळण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. योजनेच्या नामांतराच्या नावाखाली गांधीजींच्या विचारांना पद्धतशीरपणे पुसण्याचा प्रयत्न आहे.या अन्यायाविरुद्ध आज संसद भवन परिसरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर महाराष्ट्रातील खासदारांनी एकत्र येऊन महात्मा गांधीजींच्या नावाचा विसर पाडणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या या कृतीचा निषेध केला.गांधीजींचे नाव योजनेतून काढले तरी, लोकांच्या मनातून आणि भारताच्या इतिहासातून त्यांचे नाव पुसणे शक्य नाही !
