या दुष्ट सरकारनं राजकीय सूडबुद्धीनं आदरणीय सोनियाजी गांधी, मा. राहुलजी गांधी आणि काँग्रेस पक्षावर नॅशनल हेराल्ड प्रकरणात भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले, नाहक त्रास दिला, बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मात्र माननीय न्यायालयानं काल दिलेल्या निकालामुळे भाजपाचा खोटेपणा आणि दुटप्पी कारभार जनतेसमोर उघडा पडला आहे. या अन्यायाविरोधात आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी मुंबई काँग्रेसच्या वतीने अध्यक्षा खासदार वर्षा ताई गायकवाड यांच्या नेतृत्वात आज वरळीतील ईडी कार्यालयासमोर धडक मोर्चा नेण्यात आला.या मोर्चात मुंबई कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल, विविध सेल्स व काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
